मुंबई : कृषिमंत्री विधीमंडळाच्या सभागृहात केवळ ४२ सेकंद नव्हे तर २२ मिनिटे कृषिमंत्री पत्ते खेळत होते असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी केला आहे.
कृषिमंत्र्यांनी विधीमंडळाच्या सभागृहात पत्ते खेळल्याचा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. त्यावर सरकार याबाबत काही खुलासा करेल का? असाही प्रश्न रोहीत पवार यांनी उपस्थित केला आहे.
जर सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असे म्हणत रोहीत पवारांनी आठवण करून दिली. या नव्या आरोपांमुळे आतातरी कोकाटेंचा राजीनामा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.